Tuesday 7 November 2017

ज्वाला संघर्ष्याच्या

ज्वाला संघर्ष्याच्या

आज स्वतंत्र हिंदुस्तानला  ७० वर्षे पूर्ण होत असताना , आम्ही खऱ्या अर्थान स्वतंत्र झालो  का ? किंबहुना तो आम्हाला मिळालाय का असा प्रश्न निर्माण होतो . स्वतंत्र हिंदुस्तानात आजही आमच्या प्राथमिक गरजांसाठी     ( अन्न,वस्र,निवारा ) यासाठी संघर्ष करावा लागतोय .देशातील रोज करोडो लोग उपाशीपोटी झोपतात .

बालमजूर , शेतमजूर , उसतोडणी कामगार , यांची तर दयनीय अवस्था आहेच , परंतु आदिवासी ,व नक्षली भागातील समुदायाला तर छोट्या छोट्या गोष्टीसाठी मोठा संघर्ष करावा लागतो आहे .विकासाच मॉडेल मांडनाऱ्याना कदाचित यांचा विसर पडलाय कि ? हा त्यांचा डोळेझाक आहे  हे कळेनास झालाय .

भटक्या विमुक्त , दिन दलितांच्या समस्या तर भयानक आहेत . इंग्रजांच्या काळात ज्या जातींना  चोर ठरवलं गेल ते आजही चोर म्हणून संबोदले जातात . ज्यांचा जगण्याला तर काही अर्थ नाही पारंपारिक चोरीचा व्यवसाय सोडवा अस वाटत असताना प्रस्थापित यंत्रणा ,  कायदे व्यवस्था , व समाज त्यांना सुधारू देत नाही . पाथरवट , पारधी , आदिवासी परिस्थिती पाहून मन अचंभित होत . आजही या समाज्यात जन्माला आलो म्हणून ते नशिबाला दोष देतात .

स्वतंत्र हिंदुस्तानच्या पंतप्रधान स्व.इंदिराजी  गांधी यांनी  पंतप्रधान असताना गरिबी हटाओ चा नारा दिला .  त्यांच्या नंतर अनेक पंतप्रधान झाले परंतु आजही गरिबी कायम आहे . गोचीडासारखी  चीटकलेली . स्वतंत्र हिंदुस्तानात आजही रोजगार योजना राबवून रोजगाराची हमी आम्हाला द्यावी लागते . हि आमच्या स्वतंत्र हिंदुस्तानासाठी शोकांतिका आहे .........

मोठ्या कौतूकान महिला दिन देश्यात साजरा केला जातो . परंतु आज महिलांसाठी अशी परिस्थिती आहे का ? आजही पुरुषी अहंकाराचे , वासनेचे , दररोज  बळी पडतात . आजचे सर्व वृत्तपत्र याच बातम्यांनी भरलेले असतात . अल्पवयीन मुलीवर बलत्कार , विवाहितेवर बलत्कार , शाळेत जाणाऱ्या मुलीवर बलत्कार , हुंड्यासाठी पेठवून देणे , मुलगी झाली म्हणून बाळतीन बाईला लाता बुक्क्यांनी मारण , शाळकरी मुलीवर बलत्कार करून तिच्या शरीराचे लचके तोडण हे राजरोसपने स्वतंत्र हिंदुस्तानात अजून सुरूच आहेत . हिंदुस्तानातील सरकारी इस्पितळातील जळीत वार्डात गेल्यावर याची प्रचीती आपणाला येईल .

मराठा समाज्यात जन्मलो . छत्रपती शिवराय यांच वारसदार म्हणून आम्ही  समाज्यात मोठ्या दिमाखान वावरत होतो . परंतु या ७० वर्ष्यात या राज्यकर्त्यांनी वोट बँक म्हणून आमचा वापर केला . आमच्या बलत्कारी बहिणीला न्याय मिळावा म्हणून . समस्त महिला वर्गाला लाखोंचा समुदाय घेऊन रस्त्यावर उतरावं लागतेय  . आरक्षण मागाव लागतंय . वर्षानुवर्षे तोंड गप्प ठेऊन फक्त आश्वासनांचा पाऊस आमच्यावर पडतो आहे .

भ्रस्टाचार , व लाचेच म्हणाल तर , पोटच्या पोरासारख हक्क सांगितला जातो .  मग काय निमुटपणे द्याव लागत . शेतकरी , समद्या जगाचा पोशिंदा  तोच उपाशी पोटी झोपतोय . एकाच आशेने उद्या तरी स्वतंत्र हिंदुस्तानात  बळीराजाच  राज्य येईल.

..................................................................................................................................................................................................................................................................
Bala pawar nashik news 9881903111/ balapawar111@gmail.com

Sunday 1 October 2017

आश्रमशाळेच्या विध्यार्थ्यांना गरज आहे मायेची व मार्गदर्शनाची

💐💐💐💐💐💐💐💐
केंद्रस्तरीय क्रिडास्पर्धा केळीरुम्हणवाडी.....!!! अनुदानीत आश्रमशाळा देवठाणची दैदीप्यमान कामगिरी
💐🌹🌷💐🌹🌷💐🌹
1). 17 वर्षाखालील गट(मुले) प्रथम क्रमांक (कब्बडी)
2) 14 वर्ष गट (मुले) द्वितीय क्रमांक(कब्बडी)
3) 17 वर्ष गट (मुले) द्वितीय क्रमांक (खो-खो)
4) 400 मीटर रिले- प्रथम क्रमांक
5) 200 मीटर रिले- द्वितीय क्रमांक
6) उंचउडी- हिलम विक्रम हरी (प्रथम क्रमांक)
7) लांबउडी- हिलम विक्रम हरी(प्रथम क्रमांक)
8) गोळाफेक- हिलम विक्रम हरी (द्वितीय क्रमांक)
9)200 मीटर रनिंग- हिलम विक्रम हरी(प्रथम क्रमांक)
10) 400 मीटर रनिंग- हिलम विक्रम हरी (प्रथम क्रमांक)
11) 800 मीटर रनिंग- हिलम विक्रम हरी (प्रथम क्रमांक)
12) 1500 मीटर रनिंग- हिलम विक्रम हरी (प्रथम हरी)

13) उंच उडी-  बांबळे सुजीत भाऊराव (प्रथम क्रमांक)
14) लांब उडी- बांबळे सुजीत भाऊराव (प्रथम क्रमांक)
15) उंचउडी (मुली) सोंगाळ वैशाली तुकाराम(प्रथम क्रमांक)
16) 17 वर्ष गट (मुली) - द्वितीय (खो-खो)💐🌹🌷💐🌹🌷💐🌹🌷
                 व
चैम्पियन ट्रॉफी......!!!!
💐🌹🌷💐🌹🌷💐🌹

या उतुंग यशाबद्दल  आश्रमशाळा देवठाणचे सर्वच स्तरातुन कौतुक होत आहे. यशस्वी खेळाडूचे मा. मधुकररावजी पिचड साहेब(माजी आदिवासी विकास मंत्री), अकोले तालुक्याचे आमदार व संस्थेचे विश्वस्त मा.वैभवरावजी पिचड साहेब,  संस्थेचे सचिव तथा विश्वस्थ श्री. भवारी सर, अध्यक्ष श्री. भरतरावजी घाणे साहेब, खजिनदार श्री. गभाले गुरूजी व सर्व संचालक मंडळ, प्रकल्प अधिकारी व सर्व अधिकारी कर्मचारी प्रकल्प कार्यालय राजूर यांनी अभिनंदन केले आहे.

यशस्वी विद्यार्थ्यांना आश्रमशाळेचे मुख्याध्यापक श्री. सदगिर एस. एन(माध्य) व बो-हाडे एस. टी (प्राथ), क्रीडा शिक्षक श्री. कानवडे सर ( प्राथ ), श्री.बाळा पवार सर ( माध्य ), सर्व शिक्षक, अधिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले...!!
💐🌹🌷💐🌹🌷💐🌹💐🌹💐🌹🌷💐🌹🌷💐🌹🌷💐🌹🌷

Sunday 10 September 2017

क्या मे सही थी ?

सुबह 5 बजे धिरे से  दरवाजा खोला | सब आराम से सो रहे थे |  कल रात को ही मैने सब तैयारी  कर ली थी |  निखिल घर के निचे आकर खड़ा था | अपनी दोस्त की फोर व्हीलर लेके | घर का दरवाजा धीरे से बंद किया  | किसी ने देखा नहीं यह समजते ही , गाड़ी में जाकर बैठ गई |  निखिल ने गाड़ी सुरु की , गाड़ी जलद गती से पुणे की ओर निकल पड़ी |

घर वालो की मर्जी के बगेर में निखिल के साथ निकल पड़ी थी | में सही हु या ग़लत इसका फ़ैसला भी में नहीं कर पा रही थी | थक गई थी में घरवालो के सवालो  के जबाब देते – देते  | दादा , ताई , बाबा , आई , के उठते – बैठते सवाल  कहा जा रही है ? कहा से आ रही हे ? किसके साथ थी ? किसका फोन था ? किससे बात कर रही थी ? ऊफ ......

में थक गई थी सबको समझाते – समझाते निखिल कितना मेरे लिए अच्छा हें | वह सझदार हें मुझे जिंदगीभर प्यार करेगा | में उसके साथ जिंदगीभर खुश रहूंगी  | लेकिन किसीने मेरी एक नहीं सुनी | आखिर मुझे यह कदम उठाना पड़ा |

आज में उस पिंजरे से मुक्त हो गई | आते समय चिट्टी छोड़कर आई आई – बाबा में निखिल के साथ जा रही हु | हमेशा के लिए .........

3 घंटो के बाद गाड़ी  पुणे में पहुच गई | निखिल के दोस्तों ने पुणे के बाहर एक गाव के मंदिर में शादी की सब व्यवस्था की थी | पंडितजी भी आए थे वहा हमारी शादी हुई | फोटो निकाले गए | दुसरे ही दिन कोर्ट जाकर शादी की  | शादी की सर्टिफिकेट ली | दस्तकत करने के लिए निखिल के दोस्त थे | मेरी फ्रेंड निशा ने मेरी और से दस्तकत किया | हो गई शादी |
निखिल के घरवालो को भी मालूम नहीं था | जब उन्हें मालूम हुवा तो उसके माँ – बाप , दोन्हो भाई – बहन ने बहोत हंगामा किया | लेकिन बाद में निखिल ने जब समझाया तब सारे मान गए | में तो पूरी डर गई थी | आखिर में राहत की सास ली |
.....................................................................................................................................................................................................................................................................................................
लेख – क्या में सही थी ? भाग – 1 फोटो ( शशिकांत धोत्रे ) अगर आप को यह लेख पसंद आया तो पोस्ट शेअर करे अगले लिंक पर जाकर मेरा फसबुक पेज like https://m.facebook.com/story.php?story_fbid=1592838247404075&id=651394361548473  करे  | bala pawar nashik news 9881903111. balapawar111@gmail.com

Sunday 3 September 2017

अधर्माचा बाजार

अधर्माचा बाजार
सध्या  देश्यात विविध अधर्मी बाबांचा प्रस्थान वाढताना दिसतंय .डॉ.नरेंद्र दाभोळकर हमीद व मुक्ता दाबोळकर यांनी केलेलं अंधश्रद्धा निर्मुलनावर केलेले काम कौतुकास्पद आहे . परंतु त्यांचे हे कार्य निष्फळ ठरत कि काय ? असा प्रश्न निर्माण होतोय  .
काही दिवसापूर्वी आपल्या आश्रमातील सांध्वीवर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी बाबा राम रहीम सिंग याला सन्माननीय. न्यायालयाने २० वर्ष्याची शिक्षा ठोठावली . ज्या पिढीत रंणरागीनीने आपल्या जीविताची पर्वा न करता कोर्टात साक्ष दिली . व या नरादमाला त्याची खरी जागा दाखवून दिली त्या रणरागीणीला सलाम !
आसाराम बापू , बाबा रामपाल , स्वामी परमहंस , कृपाळू महाराज , राधे माँ असे डोंगी बाबा निर्माण होण्याला जबाबदार कोण ? या बाबांनी आपापल्या भोगोलिक क्षेत्रात इतके प्रस्थान बसविले आहे कि , यांच्या आलिशान आश्रमात जाऊन प्रख्यात राजकारणी , मंत्री ,पोलीस अधिकारी ,चित्रपट अभिनेते ,नामांकित खेळाडू या बाबांना लोटांगण घालतात . त्यांचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी लाखो करोडो रुपयांची देणग्या आश्रमांना देतात . मंत्री या आश्रमांना अनेक सवलती देतात .कर माफ करतात . पोलीस अधिकारी संरक्षण पुरवितात . या मोबदल्यात बाबा आपल्या भक्तांना या राजकीय पक्ष्यांना मतदान करण्याचे फर्मान सोडतात .भक्त म्हणजे या राजकीय मंडळींचा वोट बँक निवडणुका आल्या कि आपोआप राजकीय नेत्यांचे पाय आपोआप या बाबांच्या आश्रमाकडे वळतात . यातून एकमेकांचे हित जोपासले जातात .
मग काय ? सुरु होतो या स्वयम घोषित बाबांचा हैदोस सर्व यंत्रणा आपल्या खिश्यात असल्याने आश्रमात सुरु होतो धार्मिकतेच्या नावावर अंधश्रदेचा बाजार . अनैतिकतेचा व्यापार , कोमजले जातात अनेक निष्पाप देह , अनेक चिमकुले जीव बाबांच्या वासनेचे  बळी ठरतात .
आपल्या स्वार्थासाठी हि राजकीय मंडळी  , स्वयंघोषित धर्मगुरू ,सर्व सामान्याचा छळ करतात . हे अजून किती काळ आपण सोसणार ?
आज गतीला न्याय व्यवस्था सर्व सामन्यांचा आधार आहे . उशिरा का होईना पिडीताना न्याय मिळाला .
या पुढे अश्या घटनांना आळा बसावा बाबा संस्कृती बंद व्हावी अस वाटत असेल तर समाज्यातील सर्व घटकांनी डॉ. नरेद्र दाभोलकर यांच्या अंधश्रद्धा निर्मुलनाचा वसा आपण सर्वांनी मिळून पुढे न्यायला हवा .
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
बाळा पवार नाशिक न्यूज ९८८१९०३११११ . BALAPAWAR111@GMAIL.COM
लेख आवडला असेल टार नक्की शेअर करा . फेसबुक पेज ला पुढील लिंक वर जाऊन अवश्य भेट दया .https://m.facebook.com/story.php?story_fbid=1585927011428532&id=651394361548473

Monday 21 August 2017

बाप ।।।

लहानपण बापाच्या हाता खांद्यावर खेळता खेळता निघुन गेले , पण जशी जशी मोठी होत गेले ,तस तस बापापासून  दूर होत गेले .व आईच्या सानिध्यात राहत गेले आई जास्त जवळची वाटत गेली . शाळा कॉलेज पर्यंत काही लागल तर ,आईकड़े साकडे घालने मग आई बापाला सांगणार, मग माज़ी मागणी पूर्ण होत असे .बाबा कामावरुन आले की दमलेले असायचे .कायम चिंतित असायचे. कधी चिड़ायाचे ,माज शिक्षण, दादाच शिक्षण , आजी आजोबच आजारपण , अश्या अनेक कारनानी ते बेचेन असायचे. परंतु ,ते दाखवत नसायचे . परंतु ते मला जाणवत असायच . बाबाशी खुप बोलावे ,त्यांच्या सहवासात रहाव ,अस अनेकदा वाटायच .परंतु बाबांच चिडका स्वभावामुळे मी त्यांच्या पासून थोड़ी दुरावत असल्याची जाणीव मला होत होती. मला घरी यायला जरी उशीर जाला तर, माज्यावर खुप चिडायके , रागवायचे . मलाही त्यांचा खुप राग यायचा .मी कित्येक दिवस त्यांच्या सोबत बोलत नसायचे. अस वाटायच बाबा किती कठोर आहेत ? त्यांच्याशी काही बोलायला भीती वाटायला लागली . अस वाटायच ,त्यांच काहीच माज़्यावर प्रेम नाही. ते माजा नेहमीच तिरस्कार करतात .पण तो माजा भ्रम होता . मी न जेवता रागात जोपी जायचे, तर ते सुद्धा, न जेवता जोपायच. ह्या पासून मी अनभिन्न असायचे . आयुष्यात इतक्या अडचणी आल्या, संकट आली ,परंतु त्यांच्या डोळ्यात मी कधी अश्रु आलेले पहिले नाही . पण ज्या दिवशी ,माज लग्न जाल त्या दिवशी मात्र मला गळ्याशी घेऊन बारीक मुलासाराख डसाडसा रडले . त्यांच्या या वागन्याने मी भारावून गेले . बाबा माफ करा ,  मी तुम्हाला इतके दिवस समजु शकले नाही . कठोर तुम्ही नाही .मी होते . निष्काळजी तर मी होते , तुम्ही तर आजपर्यत माजी काळजी घेतली . आईच प्रेम दिसायच पण ,तुमच कधी दिसल नाही . मला वाटत प्रत्येक बाप हा असाच असतो . मी सासरी घेल्यानंतर ,बाबा खुप खचले, बेचेन जाले , अन्न पान्याकडे , कामाकडे लक्ष नाही . माहेरी आले तेव्हा कळल .मी गेल्या पासून बाबा आजारी पडलेत. त्यांनी आई दादाला सांगून ठेवल होत .मी आजारी आहे हे तिला कळवू नका. तिच लग्न जालय , हे दिवस तिच्यासाठी खुप आनंदाचे आहेत. तिला आंनद घेऊ दया . बाबा ...….  आजपर्यंत मी देव कधी पहिला नाही इतके दिवस तो तुमच्या स्वरुपात माज्या समोर होता परंतु, तो मला कधी कळला नाही   .                                                                                .                                                                       बाळा पवार ( नाशिक न्यूज़ मीडिया  9881903111)

जोगवा

विजयकुमार दळवी यांनी लिहिलेल्या ` जोगवा ’ हि कादंबरी नुकतीच वाचली . मानसिक गुलामगिरीच्या उद्द्वस्ततेचे प्रभावी चित्रण या कादंबरीच्या माध्यमातून मांडण्यात आलाय .
२१ व्या शतकात वावरताना अंधश्रद्देचे प्रमाण अजून कमी होताना दिसत नाही . श्रद्धा ठीक परंतु अंधश्रद्धा काय कामाची ?
आज काल देव देवतांच महत्व कमी होत असून , भोन्दुबाबांनी आपले बस्तान बसवले आहे . भोन्दुबाबांच्या मागे स्वताला सुशिक्षित म्हणून घेणारेच धावत आहेत . तेथील देणगी पेट्या नोटांनी तुडूंब भरत आहेत . नोकरीत व व्यवसायात गरिबांना लुटायचे आणि समाधानासाठी भोन्दुबाबांच्या पायावर लोटांगण घालणारी नवी पिढी उदयास येऊ घातली आहे .
देवी यल्लामाच्या मानसिक  कल्पनेतून , लहान मुला - मुलींना नवस फेडण्यासाठी देवीला सोडून श्री व पुरुष्याच  आंख  आयुष्य शापित करण्याचा हा डाव . जोगवा मागायला लावून शरीराच बाजार मांडायला लावणारा हा समाज पापी का पुण्यवान ?
मागे २-३ वर्षापूर्वी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते हेरंभ कुलकर्णी यांनी अहमदनगर जिल्यातील अकोले तालुक्यात अशीच एक घटना प्रकाशात आणली होती .व तसा त्या निष्पाप मुलीला त्यांनी  न्याय मिळून दिला . या कादंबरीत असणार सरपंच व अंधश्रद्धा निर्मुलन कार्यकर्ते देशपांडे याचं पात्र काही प्रमाणात हेरंब कुलकर्णी सरांशी मिळत-जुळत आहे .
जोगवा कादंबरी खूप कलात्मक रीतीने लिहिली घेली आहे . विशेष म्हणजे या कादंबरी वर मराठी चित्रपट जोगवाची निर्मिती करण्यात आली आहे .
रिया पब्लिकेशन्सने प्रकाशित केलेली हि कादंबरी आपण जरूर वाचा तुम्हाला नक्की आवडेल .
.............................................................................................................................................................................................................................................................................
फोटो कादंबरी व चित्रपटातील आहेत . बाळा पवार नाशिक न्यूज balapawar111@gmail.com 98819031111.             https://m.facebook.com/story.php?story_fbid=1567482313273002&id=651394361548473

Sunday 20 August 2017

अॅडॉल्फ हिटलर महत्वकांक्षी प्रशासक

मंदाकिनी भारद्वाज  यांनी लिहिलेलं `अॅडॉल्फ हिटलर महत्वकांक्षी प्रशासक ` हे पुस्तक वाचनात आल .
हिटलर १२ वर्षे जर्मनीचा प्रशासक होता . त्याच्या कार्यकाळाची परिणीती दुसऱ्या महायुद्धात झाली . या युद्धात लाखो लोक मारले गेले . याच कारणास्तव हिटलरची दुष्ट ,व्यक्ती म्हणून गणना करण्यात आली .

जर्मनीची सध्य परिस्थिती बदलून जगाच्या राजकारणात सर्वोच्च स्थान मिळवून देऊन जागतिक महासत्ता गाजविण्याचा त्याचा प्रयत्न होता .

बालपण , किशोरवयीन जीवन त्याने खूप एकटेपणाने घालविली असल्याने त्याचा परिणाम त्याचा स्वभावात झालेला दिसतो .त्याचा मनात ज्यू लोकांविषयी असणारा संताप व त्याच्या चुकीच्या निर्णयामुळे शेवटी त्याला आत्महत्या कराव लागल . एका महान प्रशासकाचा असा शेवट होण काळजाला भिडणार आहे .

मंदाकिनी भारद्वाज यांच्या लिखाणामुळ दुसऱ्या महायुद्धाच चित्र डोळ्यासमोर उभ राहत .
हिटलरच्या आत्मह्त्तेन हेच शिद्द  होत कि , युद्धाने विकास होवू शकत नाही . अहंकार तुमची बुद्धी भ्रष्ट करून विचारशक्ती कमकुवत करते .

रिया पब्लिकेशन्स हे पुस्तक जरूर वाचा खूप काही शिकण्यासारख आहे . तुम्हाला नक्की आवडेल . खास करून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्त्याना .....

 .................................................................................................................................................................
बाळा  पवार नाशिक न्यूज ९८८१९०३१११ . balapawar111@Gmail.com                                                पुढील वर जाऊन माझ्या फेसबुक पेज ला अवश्य भेट द्या .....https://m.facebook.com/story.php?story_fbid=1436401729785268&id=100002463644709